Monday 20 October 2014

मित्रः कोणाला मत देणार रे?
मी: बघु. कन्फ्युज आहे नेहमीसारखाच.  तू कोणाला देणार? बीजेपी?
मित्रः नाय रे. यावेळी त्यांना नाय देणार.
मी: का रे? लोकसभेला तर तूच मोदी मोदी करत होतास. आता काय झालं.
मित्र : एकाच माणसासाठी दोन दोन वेळा वोट थोडी करायचं असतं? यावेळी काँग्रेस किंवा मनसे पैकी कोणाला तरी देणार.
मी : काँग्रेस??!! मनसे??!!
मित्र : काँग्रेस कारण गेल्या पाच वर्षात आपल्या एरियात काँग्रेसच्या आमदारने बरंच काम केलंय, जे समोर दिसतंय आणि मनसेचा ऑप्शन कारण मला राज बोलतोय ते आवडतंय. मुद्द्यावर तरी बोलतोय. ब्लू प्रिंटवर पण मेहनत घेतलीये.
मी : अरे पण चारच महिन्यांपुर्वी तू काँग्रेसला शिव्या घालताना थकत नव्हतास आणि मनसेचं नावही तुझ्या तोंडात नव्हतं. मग आता असं काय......??
मित्रः तेव्हा वेगळं होतं रे. आता युतीने जो बाजार मांडला तो मला बिलकुल आवडला नाही. आघाडीला तर मी खिजगणतीतही धरत नाही. थोडक्यात यावेळी पक्ष-बिक्ष, त्यांच्या भुमिका-वुमिका सब झूठ. सगळेच खुर्चीवादी. म्हणून एक साधा सोप्पा नियम...
'मत देताना केंद्रात पार्टी बघितली आता राज्यात फक्त उमेदवार बघणार.त्यांच्या पार्ट्या गेल्या खड्ड्यात!!!'

0 comments:

Post a Comment

 

Neo-paradoxes Design by Insight © 2009