बीजेपीला जर का १३५ वगैरे जागा मिळाल्या असत्या तर शिवसेनेला आता जितकं महत्व आलंय ते आलं नसतं. पवारांनी आता खेळलेला शेवटचा पत्ता सुद्धा त्यांना खिशातून बाहेर काढता आला नसता. पत्रकार अपक्षांना कव्हर करत नी वेगवेगळ्या थेअर्या मांडत बसले असते. ठाकरे-पवारांकडे कोणी फारसं फिरकलंही नसतं. जसं आता सध्या काँग्रेसकडे कुणी पत्रकार फिरकत नाहीयेत. राष्ट्रीय निवडणुका असोत वा राज्यांतल्या, छोट्या प्रदेशिक पक्षांचा सुपडा साफ झाला आहे. सेनेने काढलेला अस्मितेचा मुद्दा त्यांना मनाप्रमाणे सीट्स देउ शकला नसला तरी तारून गेलाय. सेना-राष्ट्रावादी या प्रादेशिक पक्षांचा परफॉर्मंस का काही वाखाणण्याजोगा नाही. केवळ बीजेपीचा रथ थोडक्यासाठी रोखला गेल्याने यांना महत्व आलंय. शेवटी सत्ताकारणात नियम एकच, 'ज्याची जितकी न्युसंस व्हॅल्यु तितकंच त्याला महत्व जास्त'
आता सध्या ही वॅल्यु उद्धवकडे सगळ्यात जास्त आहे. तर पवार आपली न्युसंस वॅल्यु टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. बाकीचे पक्ष इव्हन महायुतीतले छोटे मित्रपक्षसुद्धा मायनसमध्ये गेलेत. याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर विनायक मेटेंपेक्षा पर्फेक्ट उदाहरण नसेल.
आता सध्या ही वॅल्यु उद्धवकडे सगळ्यात जास्त आहे. तर पवार आपली न्युसंस वॅल्यु टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. बाकीचे पक्ष इव्हन महायुतीतले छोटे मित्रपक्षसुद्धा मायनसमध्ये गेलेत. याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर विनायक मेटेंपेक्षा पर्फेक्ट उदाहरण नसेल.
0 comments:
Post a Comment