केवळ राज ठाकरेंचा अॅटीट्युड'च' त्यांच्या पराभवाला कारणीभूत आहे असं मला नाही वाटत. त्यांच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या ग्राफची अनेक कारणे आहेत. अॅटीट्युड हे मेजर कारण आहेच पण इतरही बरीच आहेत.
राज एका ठराविक वर्गाला पोलोराईझ करुन हुकमी राखीव मतं ठेवण्यात अयशस्वी झाला. त्यात मोदीलाटेने प्रादेशिक पक्षांची स्पेस खाल्ली. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर तर सेना गेल्या वर्षभरापर्यंत जवळपास पण नव्हती पण अचानक सगळा सिट शेअरींगचा बाजार करुन सवरुनही मराठी मुद्दा केवळ १५ दिवस उचलून त्यांनी त्यावर मतेही मिळवली. आता पोलोरायझेशनचा जमाना आहे. राज ना धड मुसलमानांना जवळ करु शकला, ना मराठी मतांना, ना दलितांना. त्याने राम कदम सारख्यांना पाठीशी घातले, आठवलेंना विनाकरण फुटेज देऊन मिमिक्रीयुक्त टिका करत बसला. जेव्हा मोदींनी मुंबईत रेल्वेचे भाव वाढवले तेव्हा मनसे वाले गायब होते. तेव्हा आला असता तर शाईन झाला असता. सिझनल पॉलिटिक्स महागात पडलं.
बाकी आडमुठ्या भुमिकेमुळे कुणाशी धड युति केली नाही. नाहीतर दुसर्यांच्या आधाराने आपली वेल वाढवली असती वगैरे...बाकी नोबडी केअर्स अबाऊट भुमिका-वुमिका. लोकं लवकर विसरतात. त्यात परत त्वेषाने ज्या भुमिका घेतल्या त्याही बदलल्या. सेना-मनसेचा वोटर वेगळा आहे. उपाशी राहून अस्मितेच्या मुद्य्यांवर व्होट करणारा आहे. अशा भुमिका बदललेल्या त्यांना आवडत नाहीत. हे मी जितक्या मनसे सपोर्टर मित्रांशी बोललो तेव्हा जाणवलं. लोकांनी जितक्या जास्त अपेक्षा ठेवल्या, त्यांचा तेवढाच मोठा अपेक्षाभंग नाशिककडे बघून झाला. आता मनसे राजकीयदॄष्ट्या अडगळीत आहे. जनरली स्थापनेचं कारण बंडखोरी असेल तर तीच त्या पक्षाची न्ञुजवॅल्यु जास्त असते. तेच मिडीयानेपण केलं. ब्लू प्रिंट्बद्दल हार्डली २-३ प्रश्न विचारले गेले असतील. सगळे प्रश्न सेना आणि मोदीवरच होते. बाकी राज ठाकरे मिडीयावर भडकतात त्याचं मला पार काही वाटत नाही. अतिशय फालतू प्रश्न वारंवार विचारणे, केवळ टिआरपी लाईन्स शोधणे आणि मुलाखतकर्त्याने सुपारी घेतल्यासारखी मुलाखत घेणे हे प्रकार मला खूप जास्त आढळले. कंपेअर करायला माझा कट्टावर देवेंद्र फडणवीसला त्यांच्या आयातीबद्दल जितके छान गोग्गोड प्रश्न विचारले गेले आणि त्याची आपदधर्म-शाश्वतधर्म असली थिल्लर मांडणी करुन त्याने ते हसत खेळत टोलवले हे पहावं लागेल. मिडीयावाल्यांनी तर असल्या मुद्द्यांवर बीजेपीला रडवल्म पाहीजे. पण पोसणार्या बापाला गुणी पोरं रडवत नाहीत!!
राज एका ठराविक वर्गाला पोलोराईझ करुन हुकमी राखीव मतं ठेवण्यात अयशस्वी झाला. त्यात मोदीलाटेने प्रादेशिक पक्षांची स्पेस खाल्ली. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर तर सेना गेल्या वर्षभरापर्यंत जवळपास पण नव्हती पण अचानक सगळा सिट शेअरींगचा बाजार करुन सवरुनही मराठी मुद्दा केवळ १५ दिवस उचलून त्यांनी त्यावर मतेही मिळवली. आता पोलोरायझेशनचा जमाना आहे. राज ना धड मुसलमानांना जवळ करु शकला, ना मराठी मतांना, ना दलितांना. त्याने राम कदम सारख्यांना पाठीशी घातले, आठवलेंना विनाकरण फुटेज देऊन मिमिक्रीयुक्त टिका करत बसला. जेव्हा मोदींनी मुंबईत रेल्वेचे भाव वाढवले तेव्हा मनसे वाले गायब होते. तेव्हा आला असता तर शाईन झाला असता. सिझनल पॉलिटिक्स महागात पडलं.
बाकी आडमुठ्या भुमिकेमुळे कुणाशी धड युति केली नाही. नाहीतर दुसर्यांच्या आधाराने आपली वेल वाढवली असती वगैरे...बाकी नोबडी केअर्स अबाऊट भुमिका-वुमिका. लोकं लवकर विसरतात. त्यात परत त्वेषाने ज्या भुमिका घेतल्या त्याही बदलल्या. सेना-मनसेचा वोटर वेगळा आहे. उपाशी राहून अस्मितेच्या मुद्य्यांवर व्होट करणारा आहे. अशा भुमिका बदललेल्या त्यांना आवडत नाहीत. हे मी जितक्या मनसे सपोर्टर मित्रांशी बोललो तेव्हा जाणवलं. लोकांनी जितक्या जास्त अपेक्षा ठेवल्या, त्यांचा तेवढाच मोठा अपेक्षाभंग नाशिककडे बघून झाला. आता मनसे राजकीयदॄष्ट्या अडगळीत आहे. जनरली स्थापनेचं कारण बंडखोरी असेल तर तीच त्या पक्षाची न्ञुजवॅल्यु जास्त असते. तेच मिडीयानेपण केलं. ब्लू प्रिंट्बद्दल हार्डली २-३ प्रश्न विचारले गेले असतील. सगळे प्रश्न सेना आणि मोदीवरच होते. बाकी राज ठाकरे मिडीयावर भडकतात त्याचं मला पार काही वाटत नाही. अतिशय फालतू प्रश्न वारंवार विचारणे, केवळ टिआरपी लाईन्स शोधणे आणि मुलाखतकर्त्याने सुपारी घेतल्यासारखी मुलाखत घेणे हे प्रकार मला खूप जास्त आढळले. कंपेअर करायला माझा कट्टावर देवेंद्र फडणवीसला त्यांच्या आयातीबद्दल जितके छान गोग्गोड प्रश्न विचारले गेले आणि त्याची आपदधर्म-शाश्वतधर्म असली थिल्लर मांडणी करुन त्याने ते हसत खेळत टोलवले हे पहावं लागेल. मिडीयावाल्यांनी तर असल्या मुद्द्यांवर बीजेपीला रडवल्म पाहीजे. पण पोसणार्या बापाला गुणी पोरं रडवत नाहीत!!
0 comments:
Post a Comment